राधानगरी महाविद्यालयास नॅककडून बी प्लस ग्रेड प्रदान नॅक, बेंगलोर यांचेकडून राधानगरी महाविद्यालयाच्या नोव्हेंबर २०२१ पासून सुरू झालेल्या मूल्यमापन प्रक्रियेचा शेवटचा टप्पा म्हणून दि. २५/२६ जुलै २०२२ रोजी कृष्णा विद्यापीठ, हैद्राबादचे माजी कुलगुरू डॅा. व्यंकय्या हुन्नाम यांच्या अध्यक्षतेखाली पिअर टिमने महाविद्यालयास भेट दिली. यावेळी पिअर टिमने शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांच्या बरोबरीने संस्था प्रतिनिधी, आजी-माजी विद्यार्थी आणि पालक यांच्याशी संवाद साधला. डोंगराळ, दुर्गम आणि अभयारण्य अधिवासातील परिसरात महाविद्यालयाचे उच्च शिक्षणामध्ये महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे मत यावेळी पिअर टिमने नोंदवले. गेले ६ महिने सुरू असलेल्या नॅक प्रक्रियेचा आज अंतिम निकाल आला असून महाविद्यालयास २.७० इतके गुण व बी प्लस ही ग्रेड प्राप्त झाली आहे. महाविद्यालयास मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल विद्यार्थी आणि ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यामध्ये खेळाचे महत्त्व जाणून घेऊन योग्य ती दिशा घेतली तर निश्चित ऑलिम्पिकचे ध्येय शिवाजी विद्यापीठासाठी दूर नाही असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी..टी.शिर्के यांनी केले. शिवाजी विद्यापीठ व राधानगरी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कोल्हापूर जिल्हा विभागीय स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. समारंभास कोल्हापूर जिल्हा क्रीडा परिषदेच्या अध्यक्ष प्राचार्य डॉ. पाटील , तसेच क्रीडा विभागाचे प्रभारी संचालक डॉ.पी. टी.गायकवाड, राधानगरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी.एस.मोरूस्कर, बिद्री महाविद्यालयाचे प्रो. एन. डी. पाटील सर व मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना कुलगुरू पुढे म्हणाले, आपल्याला 2024 ओलंपिकचे उद्दिष्ट पार पाडायचे आहे त्यासाठी सर्वांनी मेहनत घ्यावी व शिवाजी विद्यापीठाचा नावलौकिक देश तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर करावा असेही ते म्हणाले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रा. निलेश पाटील यांनी केले. शेवटी आभार प्...
“ग्रंथ हेच गुरु" 'ग्रंथ हेच आपले गुरू असून सर्वांगीण विकासासाठी वाचनाशिवाय पर्याय नाही’ असे मत राधनागरी महाविद्यालय, राधनागरीचे ग्रंथपाल श्री कुंभार के एम यांनी व्यक्त केले. ते गुरूवार दि. १३ आॅगस्ट २०२० रोजी महाविद्यालयात संपन्न झालेल्या ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस.आर.रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. व्यक्तिच्या जीवनात गुरुचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असते. जन्मतः आई ही गुरु असते, त्यानंतर शाळा,काॅलेज मधील शिक्षक हे गुरु असतात. आणि तिसरा गुरु म्हणून ग्रंथांचा उल्लेख करावा लागतो. सध्याच्या काळात इंटरनेटच्या सोयीमुळे पुस्तक वाचन खूपच कमी झालेचे दिसून येते. इंटरनेट च्या माध्यमातून ग्रंथाचा आवश्यक तेवढ्याच भागाचे वाचन केले जाते त्यामुळे किती तरी उपयुक्त माहितीपासून वाचक वंचित राहातो. ग्रंथवाचनामुळे व्यक्ती वैचारिक स्वावलंबी होते. असे प्रतिपादन के. एम. कुंभार यांनी यावेळी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डाॅ.एकनाथ पाटिल होते. प्रा. डॉ. एकनाथ पाटिल यांच्या हस्ते डॉ. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमास प्रा. डॉ नितिन जरंड...
Comments
Post a Comment